महत्वाच्या पोस्ट

PSI Pre Exam Paper 2013 - History

             






१) मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली?

  A. सहदरण आय्यपन
  B. नारायण गुरु
  C. हृदयनाथ कुंजरू
  D. टी.एम. नायर

----------------------------------------------------------------------
२) बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते?

   A. कथा
   B. कादंबरी
   C. काव्य
   D. नाटक

-----------------------------------------------------------------------
३) श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे?

  A. त्यांनी प्रथम मजूर संघटना 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' स्थापन केली
  B. त्यांना त्यांच्या हिंदू-मुस्लीम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला.
  C. त्यांना 'जस्टीस ऑफ पीस' हा पुरस्कार देण्यात आला.
  D. वरील एकही नाही

------------------------------------------------------------------------
४) क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?

  A. भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे. नसल्यास बाहेरून आयात करणे.
  B. श्रीमंताकडून कोणत्याही मार्गाने पैसे काढणे.
  C. रेल्वे लाईन व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटीश साम्राज्य अडचणीत येईल.
  D. वरील सर्वाचा त्यात समावेश होता

-------------------------------------------------------------------------
५) बापुजी आणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले?

  A. त्यांनी मीठ तयार केले व संविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला.
  B. त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या.
  C. त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला.
  D. त्यांनी पाश्चिमात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली.

-------------------------------------------------------------------------
६) भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेस मान्यता दिली?

  A. भातातीय राष्ट्रीय ट्रेड युनियन कॉंग्रेस
  B. अखिल भातारीय लाल ट्रेड युनियन कॉंग्रेस
  C. अखिल भातारीय ट्रेड युनियन कॉंग्रेस
  D. अखिल भारतीय किसान सभा

-------------------------------------------------------------------------
७) सशस्त्र क्रांतिकारकांच्या आणि त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्य जोड्या लावा.

अ)  श्रीधर परांजपे                १. हैद्राबाद
ब)  डॉ. सिद्धनाथ काणे        २. अमरावती
क)  दादासाहेब खापर्डे           ३. यवतमाळ
ड)  नार्हरीपंत घारपुरे            ४. वर्धा,नागपूर

              अ)  ब)  क)  ड)
  A.   ४   ३    १    २
  B.   ४   ३    २    १
  C.   १   २   ३    ४
  D.   २   १   ४    ३

-------------------------------------------------------------------------
८) शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता?

  A. जी.बी.वालंगकर
  B. ज्योतिबा फुले
  C. वरील दोघांचाही
  D. वरील कोणाचाही नाही

PSI Pre Exam Paper 2013 - Science

९) खालीलपैकी कोणती वाक्ये चुकीचे आहेत?

  A. सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार-समांतर सरकार सुरु केले.
  B. याश्वाणराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला.
  C. प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या
  D. वरीलपैकी एकही नाही

-------------------------------------------------------------------------
१०) जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीच्या कामात आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते?

  A. त्यांनी केसरी मराठीत व मराठा इंग्रजीत १८८१ मध्ये सुरु केले.
  B. आगरकरांनी मराठाचे तर टिळकांनी केसरीचे संपादन केले
  C. वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत.
  D. वरील एकही विधान बरोबर नाही.

-------------------------------------------------------------------------
११) कोळींच्या संदर्भात कोणते विधान अयोग्य ठरेल?

  A. कोळींनी तीन टप्यांत उठाव केला १८२४, १८३९ व सुमारे १८४५ मध्ये.
  B. कोळी साधे, कोळी व डोंगरी कोळी तसेच सोन कोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागलेले होते.
  C. इंग्रज कोलींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत.
  D. वरील एकही नाही.

-------------------------------------------------------------------------
१२) वासुदेव बळवंत फडकेंबद्दल काय खरे नाही?

  A. त्यांनी स्वताची ओळख लपवण्यासाठी दाढी राखली होती व साधूंच्या वेशात लोकांत जनजागृती केली होती.
  B. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत व प्रथमतः त्यांनी लष्करात नोकरी केली व तद्नंतर रेल्वेत.
  C. सुरवातीस रामोशांची त्यांना मदत होती पण नंतर रामोशांनी त्यांची साथ सोडली
  D. वरीलपैकी एकही नाही

-------------------------------------------------------------------------
१३) उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजाचे प्रयत्न का फासले?

  A. उमजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती.
  B. शेतकरी व गावकरी त्यांना उद्युक्त व मदत करत होते
  C. वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत
  D. वरील एकही विधान बरोबर नाही

-------------------------------------------------------------------------
१४) गावाचा विकास कसा साधावा हे समजून सांगण्यासाठी 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला?

  A. संत तुकाराम
  B. संत एकनाथ
  C. राष्ट्र संत तुकडोजी महाराज
  D. संत नामदेव

-------------------------------------------------------------------------
१५) संथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटीश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला?

  A. संथाळ प्रदेश
  B. संथाळ इलाखा
  C. संथाळ प्रांत
  D. संथाळ परगणा

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.