महत्वाच्या पोस्ट

Social Reform Movement In India

सामाजिक प्रबोधन चळवळ- प्रश्नमंजुषा ४७                                                                                               






१) .......... यांनी विधवांच्या दारूण परिस्थितीवर 'यमुना पर्यटन' हि मराठीतील पहिली कादंबरी लिहिली?

  A. दादाभाई नौरोजी
  B. बंकिमचंद्र चटर्जी
  C. बाबा पदमजी
  D. भाऊ दाजी लाड

----------------------------------------------------------------------
२) खालील दोन विधाने विचारात घ्या.

अ) इ. स. १८७३ मध्ये 'ज्योतीराव फुले' यांनी मुंबई मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
ब) देव व भक्त यांमधील पुरोहिताची मध्यस्थी कमी करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला.

   A. फक्त अ बरोबर
   B. फक्त ब बरोबर
   C. अ बरोबर ब चूक
   D. ब बरोबत अ चूक

-----------------------------------------------------------------------
३) राजा राममोहन रॉय यांच्यासंबंधी खालील कोणते विधान चुकीचे आहे?

अ) राजा राममोहन रॉय यांना 'भारतीय प्रबोधनाचे जनक' असे म्हणतात.
ब) राजा राममोहन रॉय यांनी इ. स. १८१५ मध्ये आत्मीय सभेची स्थापना केली.
क) राजा राममोहन रॉय यांनी इ. स. १८२८ मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
ड) आपले विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी 'संवादकौमुदी' हे वृत्तपत्र सुरु केले.

  A. फक्त ड
  B. फक्त ब
  C. अ आणि ब
  D. वरीलपैकी एकही नाही

------------------------------------------------------------------------
४) प्रार्थना समाजासंबंधी असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी .......... यांनी 'एकेश्वरी निष्ठांची कैफियत' नावाचा निबंध लिहिला?

  A. डॉ आत्माराम पांडुरंग तर्खडकर
  B. डॉ भांडारकर
  C. न्या. रानडे
  D. वामन आबाजी मोडक

-------------------------------------------------------------------------
५) स्वामी दयानंद सरस्वती यांच्यासंबंधी खालील कोणती विधाने चुकीचे आहे?

अ) १८८५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली.
ब) स्वामी दयानंद सरस्वती यांनी 'सत्यार्थ प्रकाश' हा ग्रंथ लिहिला.
क) 'वेदांकडे परत चला' असा संदेंश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला.
ड) परधर्मात गेलेल्या हिंदूंना परत स्वधर्मात समाविष्ठ करून घेणाऱ्या 'शुद्धी चळवळीला' स्वामी दयानंद सरस्वती यांनी वोरोध केला.

  A. फक्त क
  B. फक्त ड
  C. अ आणि क
  D. अ ब आणि ड

-------------------------------------------------------------------------
६) इ. स. .......... मध्ये अमेरिकेतील शिकागो या शहरी जागतिक सर्वधर्म परिषदेचे आयोजन मारण्यात आले?

  A. १८९५
  B. १८९३
  C. १९०२
  D. १८९८

-------------------------------------------------------------------------
७) डॉ अॅनी बेझंट यांच्यासंबंधी खालील कोणती विधाने सत्य आहेत.

अ) डॉ अॅनी बेझंट यांनी भारतामध्ये थिऑसोफिकल सोसायटीचे नेतृत्व केले.
ब) डॉ अॅनी बेझंट यांनी बनारस येथे केंद्रीय हिंदू विद्यालयाची स्थापना केली.
क) डॉ अॅनी बेझंट यांनी भारतात होमरूल लीगची स्थापना केली.

  A. फक्त क
  B. अ आणि क
  C. फक्त ब
  D. अ ब आणि क

-------------------------------------------------------------------------
८) खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापन 'मुंबई' येथे झाली नाही.

  A. आत्मीय सभा
  B. आर्या समाज
  C. प्रार्थना समाज
  D. शारदा सदन

MPSC Current Affairs 2013

९) धर्मासुधारणेच्या उद्देशाने .............. यांनी पंजाबमध्ये 'अहमदिया आंदोलन' सुरु केले.

  A. मिर्झा गुलाम अहमद
  B. मौलवी चिराग अली
  C. सर सय्यद अहमद खान
  D. सय्यद अहमद बरेवली

-------------------------------------------------------------------------
१०) 'ब्राह्मणकन्या विवाहविचार' या ग्रंथाचा कर्ता कोण आहे?

  A. विष्णूशास्त्री पंडित
  B. विष्णुबुवा ब्रह्मचारी
  C. गोपाल हरी देशमुख
  D. बाळशास्त्री जांभेकर

-------------------------------------------------------------------------
११) रघुनाथ धोंडो कर्वे यांबद्दल खालील विधाने पहा.

अ) संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन र.धों. कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली.
ब) त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र', 'संततिनियमन' ही पुस्तके लिहिली.

  A. फक्त अ बरोबर
  B. अ आणि ब बरोबर
  C. अ बरोबर ब चूक
  D. ब बरोबत अ चूक

-------------------------------------------------------------------------
१२) खालीलपैकी कोणती संस्था 'पंडिता रमाबाई' यांनी स्थापन केलेली नाही?

  A. स्त्री विचारवती संस्था
  B. शारदासदन
  C. मुक्तिसदन
  D. आर्य महिला समाज

-------------------------------------------------------------------------
१३) ब्राह्मणेतर चळवळीच्या कोणत्या नेत्याकडे 'देशाचे दुश्मन' या ग्रंथाचे कर्तुत्व जाते?

  A. भास्करराव जाधव
  B. आण्णासाहेब लठ्ठे
  C. केशवराव जेधे
  D. दिनकर शंकर जवळकर

-------------------------------------------------------------------------
१४) अखिल भारतीय मागास जाती संघाची स्थापना कोणी केली?

  A. डॉ. पंजाबराव देशमुख
  B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  C. महर्षी वी. र. शिंदे
  D. दादासाहेब रुपवते

-------------------------------------------------------------------------
१५) .......... यांनी १८६४ मध्ये पुण्यातील गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह घडून आणला?

  A. महर्षी कर्वे
  B. महात्मा ज्योतिबा फुले
  C. न्या. रानडे
  D. लोकमान्य टिळक

ब्रिटीश शासन- प्रश्नमंजुषा ४६

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.