महत्वाच्या पोस्ट

Sti Pre Question Paper 2013 - History

Sales tax Inspector Preliminary Examination-2013 








१) ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या काराघृहात ठेवले होते?

  A. ठाणे
  B. अंदमान
  C. मंडाले
  D. एडन

----------------------------------------------------------------------
२) खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती?

अ) ज्ञान प्रसारक मंडळी
ब) बॉम्बे असोशिएशन
क) लंडन इंडियन असोशिएशन
ड) ईस्ट इंडिया असोशिएशन

   A. अ,ब आणि क फक्त
   B. ब,क आणि ड फक्त
   C. अ,ब आणि ड फक्त
   D. अ,ब,क आणि ड

-----------------------------------------------------------------------
३) भारतात रेल्वे चे जाळे उभारण्या करिता लोर्ड डलहौसीने नियोजन केले कारण

अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी
ब) ब्रिटीश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमाविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी
क) भारतात सहज व स्वस्त वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता

  A. अ फक्त
  B. अ आणि ब फक्त
  C. ब आणि क फक्त
  D. अ,ब आणि क

------------------------------------------------------------------------
४) सर अॅलन ह्युम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्या साठी प्रयत्न का केला?

अ) ते विचाराने उदारमतवादी होते
ब) त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती
क) त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवे, असे वाटत होते
ड) त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते

  A. अ आणि ब फक्त
  B. अ आणि क फक्त
  C. अ,ब आणि क
  D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत

-------------------------------------------------------------------------
५) भारतातला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रीतीशांच्या धोरणात बदल झाला कराण

अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर
ब) भारतात राष्ट्रावादास आलेले उधाण
क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम

  A. अ आणि ब फक्त
  B. ब आणि क फक्त
  C. अ आणि क फक्त
  D. अ,ब, आणि क

-------------------------------------------------------------------------
६) खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात ई.स. १८४९ मध्ये स्थापना झालेल्या ‘परम हंस’ मंडळीचा भर होता?

अ) जातीबंधाने तोडणे
ब) विधवा पुनर्विवाह
क) स्त्री शिक्षण
ड) मूर्तीपूजा बंदी

  A. अ फक्त
  B. अ आणि ब फक्त
  C. अ,ब आणि क फक्त
  D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य

-------------------------------------------------------------------------
७) हिंदुस्तान सरकारच्या १९३५ कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली?

अ) मुडीमन समिती आणि तिचा अहवाल
ब) सायमन कमिशन
क) नेहरू रीपोर्ट
ड) बॅरीस्टर जिन्नांचे १४ मुद्दे

  A. अ,ब आणि क
  B. ब,क आणि ड
  C. अ,ब आणि ड
  D. अ,ब,क आणि ड

-------------------------------------------------------------------------
८) १९०६ च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी ‘स्वराज्य’ शब्द उघडपणे वापरला आणि ह्या अधिवेशनात

अ) राष्ट्रगीत म्हणून ‘वंदेमातरम्’ पहिल्यांदाच गायले गेले
ब) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला
क) मवाळ मार्ग चा स्वीकार करण्यात आला
ड) बॅरीस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले

  A. अ आणि ब
  B. क आणि ड
  C. ब आणि क
  D. अ आणि ड

MPSC Current Affairs 2013

९) अयोग्य जोडी निवडा

  A. श्रीधरलू नायडू - वेद समाज
  B. राजा राममोहन रॉय - आत्मीय सभा
  C. रवींद्रनाथ टागोर – तत्वबोधिनी सभा
  D. शिवनारायण अग्निहोत्री – देव समाज

-------------------------------------------------------------------------
१०) अस्पृश्यांना ‘लष्करात व पोलिसात’ नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवड च्या सभेत कोणी मागणी केली?

अ) शिवराम जानबा कांबळे
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क) अॅड. बि.सी. कांबळे
ड) गोपाळबुवा वलंगकर

  A. अ फक्त
  B. ब फक्त
  C. क आणि ड
  D. ड फक्त

-------------------------------------------------------------------------
११) ब्राम्हो समाज (काही सदस्यांच्या अमुलाग्र सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे) १८६६ मध्ये दोन भागात विभागला गेला. ते दोन भाग होते:

अ) देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राम्हो समाज ऑफ इंडिया
ब) केशवचंद्र सेन यांचा आदीब्राम्हो समाज

वरील पैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे?

  A. अ बरोबर आहे परंतु ब चूक आहे
  B. ब बरोबर आहे परंतु अ चूक आहे
  C. दोन्ही अ व ब बरोबर
  D. न अ बरोबर न ब बरोबर

-------------------------------------------------------------------------
१२) इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

  A. नीळ
  B. भात फक्त
  C. गहू फक्त
  D. भात व गहू

-------------------------------------------------------------------------
१३) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या?

अ) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय.
ब) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे पर्यंत खाली आणणे.
क) लॉंर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.

  A. अ आणि ब
  B. ब आणि क
  C. अ आणि क
  D. अ,ब आणि क

-------------------------------------------------------------------------
१४) पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत?

  A. परमहंस मंडळी व रहनुमाई मझ्द्दासान सभा
  B. प्रार्थना समाज व आर्य समाज
  C. इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्विस लीग
  D. वरील तीन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही

-------------------------------------------------------------------------
१५) ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा

  A. जगन्नाथ शंकर शेठ
  B. बाळशास्त्री जांभेकर
  C. भाऊ दाजी लाड
  D. छत्रपती शाहूमहाराज

MPSC Syllabus

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.